Balbharati: "वावगे वाटत नाही..." मराठीच्या पुस्तकात ‘वन्समोअर’चा शोरवर बालभारतीने दिले स्पष्टीकरण, काय म्हणाले संचालक ?

बालभारतीचे इयत्ता पहिलीचे पुस्तक सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेत चक्क इंग्रजी शब्दाचा वापर केला आहे.
Oncemore english word in Marathi book of class 1 Criticism on Balbharati education
Oncemore english word in Marathi book of class 1 Criticism on Balbharati educationSakal
Updated on

पुणे : बालभारतीचे इयत्ता पहिलीचे पुस्तक सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेत चक्क इंग्रजी शब्दाचा वापर केला आहे. निदान मराठीचा अभ्यास करताना भाषेचा तरी विचार करायला हवा होता, अशी टीका निवड समितीवर होत आहे.

Oncemore english word in Marathi book of class 1 Criticism on Balbharati education
Bal Bharati: पहिलीतील 'जंगलात ठरली मैफल' कविता वादात! साहित्यिकांचा आक्षेप; हिंदी, इंग्रजी शब्दांचा वापर

पाठ्यपुस्तकातील कविता पूर्वी भावे यांची असून, त्या माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. निवेदक, नृत्यांगना असलेल्या भावे यांनी इयत्ता तिसरीला असताना स्वत: ही कविता लिहिल्याचे म्हटले आहे. कवितेमध्ये जंगलात जमलेल्या प्राण्यांच्या मैफलीचे वर्णन केले आहे.

त्यामध्ये अस्वल, हत्ती, कोल्होबा, वाघोबा अशी प्राण्यांची नावेही आहेत. मात्र कवितेच्या काही कडव्यांमध्ये हिंदी व इंग्रजी शब्दांचा वापर केला आहे. विशेषत: कवितेतील ‘बात’, ‘शोर’ व ‘वन्समोअर’ या शब्दांवर आक्षेप घेतला जात आहे.

‘ही कविता सुमार दर्जाची असून बालभारती मंडळ अशा कवितांची निवड कोणत्या निकषांवर करते,’ असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे. कवितेच्या एका ओळीमध्ये ‘वन्समोअर, वन्समोअर झाला शोर’ असे म्हटले आहे.

किमान मराठी भाषा शिकवताना तरी मराठी शब्द वापरायला हवेत, अशी टीका होत आहे. सोशल मीडियावर एकूणच बालभारतीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रम, त्यामध्ये निवडले जाणारे साहित्य, निवड समिती आणि त्यातील हितसंबंध या अनुषंगाने टीका होत आहे.

पहिलीच्या पुस्तकात २००८मध्ये केलेल्या पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केलेला आहे. २००८पासून २०२४ पर्यंत कोणत्याही भाषा किंवा विषय तज्ज्ञांनी कवितेवर आक्षेप घेतलेला नाही. आतापर्यंत बालभारतीकडे या कवितेबाबत कोणताही लेखी आक्षेप आलेला नाही. लहान मुलांच्या कल्पनाशक्तीचा आणि भावविश्‍वाचा विचार करून कवितेचा समावेश पुस्तकात केलेला आहे. यमक जुळविण्यासाठी तो उल्लेख केलेला आहे, त्यात काही वावगे वाटत नाही.

- कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.