पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी तीन हजारांपर्यंत शिष्यवृत्ती

मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करणे हा योजनेचा उद्देश
Education
Education Sakal
Updated on

मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे आणि दैनंदिन उपस्थिती १०० टक्के राहावी, या हेतूने शासनाने मुलींसाठी विविध उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू करण्यात आलेली आहे. सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही योजना इयत्ता पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींसाठी राबवण्यात येते. किमान ७५ टक्के उपस्थिती असल्यास इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना ६०० रुपये दिले जातात. आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींना १ हजार रुपये प्रतिवर्षाला दिले जातात.

या योजनेंतर्गत ६०० रुपयांपासून ३ हजारांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी शाळांमधून समाजकल्याण विभागाकडे विद्यार्थिनींची माहिती पाठविण्यात येते. तेथून शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाते. त्यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी फायदा होतो. तसेच, मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाणही कमी होते. ग्रामीण भागातील अनेक पालक मुलींना सातवी, आठवीपर्यंत शिक्षण घेऊ देतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पुढील शिक्षण घेण्यास विरोध करून कामासाठी मुलींना शेतात पाठवतात. हे प्रमाण कमी व्हावे, यासाठी ही योजना आहे.

७५ टक्के उपस्थिती अनिवार्य

शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखल, शाळेतील ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. ही योजना इयत्ता पाचवी ते दहावीतील मुलींसाठी राबवली जात आहे.

Education
‘सीईटी’चा चेंडू ‘उच्च शिक्षण’च्या कोर्टात; बीबीए, बीबीएम, बीएमएस अन् बीसीएच्या पुरवणी परीक्षेबाबत अधिकच संभ्रम

कागदपत्रे काय लागतात?

या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते, आधार कार्ड, मागील वर्षाचे गुणपत्रक ही कागदपत्रे आवश्यक आहेत. ही माहिती शाळेमध्ये उपलब्ध असते. ही माहिती जमा करून समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवितात. तेथे तपासणी करून संबंधितांना शिष्यवृत्ती मंजूर होते.

एससीसाठी ६००, तर इतरांना अडीच ते तीन हजार

राज्य शासनाकडून वेगवेगळ्या प्रवर्गातील विद्यार्थिनींना ६०० ते तीन हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते. यात एससीसाठी ६०० रुपये आहे. आदिवासी सुवर्ण महोत्सवी योजनेत १,५०० हजार मिळतात. त्याशिवाय इतर शिष्यवृत्तीही ३ हजार रुपयांपर्यंत देण्यात येतात.

अर्ज कधी व कोठे करायचा?

पात्र मुलींनी आपला अर्ज आपल्या शाळेतील वर्गशिक्षक किंवा मुख्याध्यापकांकडे द्यावा. त्यानंतर शाळेतर्फे सर्व अर्ज समाजकल्याणकडे जमा होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.