अकोला : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचे अनुप धोत्रे यांचा विजय झाला. जिल्हयातील काँग्रेस व वंचितच्या खिळखिळ्या झालेल्या संघटनामुळे सलग पाचव्यांदा अकोला लोकसभेचा गड पाचव्यांदा भाजपने काबीज केला. त्यामुळे लोकसभेत झालेली चूक विधानसभेत तरी नको असा सवाल उपस्थित करीत काँग्रेस व वंचितच्या जिल्हा कार्यकारीणीवर पक्षातीलच कार्यकर्त्याकडून टीका होत आहे.