मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसेच, हा चेहरा उद्धव ठाकरे यांचा असावा, अशी आग्रही मागणी संजय राऊत यांनी केली होती; .मात्र आता महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविना विधानसभेला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही मागणी करून ठाकरे गटाने नेमके काय साध्य केले, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.लोकसभा निवडणुकीतील यशामुळे विधानसभेला सामोरे जाताना, महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, ठाकरे गटाने विधानसभेसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करून आघाडीच्या एकजुटीत मिठाचा खडा टाकल्याचे मानले जाते. ठाकरे गटाच्या मागणीमुळे आघाडीत अस्वस्थता पसरली. .यापूर्वी लोकसभेला सांगलीत उमेदवार देण्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात जुंपली होती. निकालानंतर ठाकरे गटाचा आग्रह किती चुकीचा होता, ते अधोरेखित झाले होते. त्यातच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केल्यास कार्यकर्ते मनापासून काम करणार नाहीत. तसेच, आघाडीत पाडापाडीचे राजकारण केले जाईल, अशी भीती काँग्रेस नेत्यांना वाटते.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधमुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित न केल्यास शिवसैनिकांमध्ये वेगळा संदेश जाईल, अशी धास्ती ठाकरे गटाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ही भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारही या मागणीला फारसे अनुकूल नव्हते. मुख्यमंत्रिपद हे संख्याबळावर ठरवावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताठर भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांची मागणी हवेतच विरली. कुठलाही उमेदवार द्या, मी त्याला समर्थन देईन, असे ठाकरे यांना म्हणावे लागले; मात्र त्यांनी घेतलेल्या यू-टर्नमुळे ते भाजप, शिंदेच्या शिवसेनेच्या टीकेचे लक्ष्य ठरले..ठाकरेंचे दबावाचे राजकारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. विधानसभेतही पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल, असा आत्मविश्वास काँग्रेस नेत्यांमध्ये निर्माण झाला आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये नाही. निकालानंतर मुख्यमंत्री घोषित होतो; मात्र लोकसभेच्या निकालानंतर निर्माण झालेली राजकीय समीकरणे बघता, दबावाचे राजकारण खेळण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात. यासाठी नुकतीच उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारी केली होती. त्यांच्या या मागणीला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नकार देत, निकालानंतर चर्चा करून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवू, असे ठाकरेंना सांगण्यात आले..ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसेच, हा चेहरा उद्धव ठाकरे यांचा असावा, अशी आग्रही मागणी संजय राऊत यांनी केली होती; .मात्र आता महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविना विधानसभेला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही मागणी करून ठाकरे गटाने नेमके काय साध्य केले, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.लोकसभा निवडणुकीतील यशामुळे विधानसभेला सामोरे जाताना, महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, ठाकरे गटाने विधानसभेसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करून आघाडीच्या एकजुटीत मिठाचा खडा टाकल्याचे मानले जाते. ठाकरे गटाच्या मागणीमुळे आघाडीत अस्वस्थता पसरली. .यापूर्वी लोकसभेला सांगलीत उमेदवार देण्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात जुंपली होती. निकालानंतर ठाकरे गटाचा आग्रह किती चुकीचा होता, ते अधोरेखित झाले होते. त्यातच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केल्यास कार्यकर्ते मनापासून काम करणार नाहीत. तसेच, आघाडीत पाडापाडीचे राजकारण केले जाईल, अशी भीती काँग्रेस नेत्यांना वाटते.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधमुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित न केल्यास शिवसैनिकांमध्ये वेगळा संदेश जाईल, अशी धास्ती ठाकरे गटाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ही भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारही या मागणीला फारसे अनुकूल नव्हते. मुख्यमंत्रिपद हे संख्याबळावर ठरवावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताठर भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांची मागणी हवेतच विरली. कुठलाही उमेदवार द्या, मी त्याला समर्थन देईन, असे ठाकरे यांना म्हणावे लागले; मात्र त्यांनी घेतलेल्या यू-टर्नमुळे ते भाजप, शिंदेच्या शिवसेनेच्या टीकेचे लक्ष्य ठरले..ठाकरेंचे दबावाचे राजकारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. विधानसभेतही पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल, असा आत्मविश्वास काँग्रेस नेत्यांमध्ये निर्माण झाला आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये नाही. निकालानंतर मुख्यमंत्री घोषित होतो; मात्र लोकसभेच्या निकालानंतर निर्माण झालेली राजकीय समीकरणे बघता, दबावाचे राजकारण खेळण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात. यासाठी नुकतीच उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारी केली होती. त्यांच्या या मागणीला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नकार देत, निकालानंतर चर्चा करून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवू, असे ठाकरेंना सांगण्यात आले..ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.