संगमनेरमध्ये डॉ. जयश्री थोरात यांच्यावर अपमानास्पद भाषेत टीका झाल्यानंतर परिसरात संतापाचा उद्रेक झाला आहे. भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्येवर केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे संगमनेरमधील वातावरण तापले आहे. या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, मात्र त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला आणि विरोध दर्शवला होता.