''उभ्या आयुष्यामध्ये सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून काम करीत आलो आहे. या जीवावरच या मतदारसंघातील स्वाभिमानी कार्यकर्ते मला प्रचंड मतांनी विजयी करतील.''
कागल : ‘तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार व मंत्रीही झालो नसतो. त्याचबरोबर इतके प्रचंड कामही करता आले नसते. पण, तुम्ही दिलेल्या संधीने मला तालुक्याचे नंदनवन करता आले. हे माझे भाग्य समजतो,’ असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.