शि वसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्ह्यातील नऊ पैकी पाच जागांवर उमेदवार जाहीर केले. कन्नड, मध्य वगळता चार ठिकाणी नवे चेहरे आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तेव्हाच्या एकसंध असलेल्या शिवसेनेचा पराभव झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात सहा जागांवर विजय मिळवून शिवसैनिकांनी पराभवाचा वचपा काढला. पण, दोन गट पडल्यानंतर कमजोर झालेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २०१९ ची पुनरावृत्ती करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावेळी नवे व आयात उमेदवार देण्यात आले आहेत हे विशेष.