मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान १० ठिकाणी सभा घ्याव्यात, अशी विनंती प्रदेश भाजपने केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांपेक्षा सभांची संख्या जास्त असू शकेल, असे सांगण्यात येत आहे..विदर्भ-मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथे प्रत्येकी एक तर मुंबई एमएमआर परिसर तसेच कोकणात दोन सभा व्हाव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. दिवाळीनंतर सभा खऱ्या अर्थाने सुरू होतील. त्यानंतर पंतप्रधान ७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत परदेशात जाणार आहे. त्या काळात पंतप्रधान देशात नसल्याने काही सभा आधी, काही नंतर होतील. महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असल्याने मोदींनी अधिक सभा घ्याव्यात, असा मतप्रवाह आहे..Nandurbar Vidhan Sabha: निवडणुकीच्या रणधुमाळीत आश्वासनांचाच पाऊस! आदिवासी मजुरांचे स्थलांतर, बंद साखर कारखाने कळीचे मुद्दे.योगींचा दौरा ,शहांच्या बैठकामोदींच्या दौऱ्याचे नियोजन करतानाच ते जाऊ शकणार नाहीत तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा होतील. ते मेळावे घेत नियोजनावर भर देतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभांची मागणी आहे. गेल्या लोकसभेत त्यांच्या सभांची संख्या मर्यादित होती. आता केवळ महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांत निवडणुका असल्याने नेते सभांसाठी वेळ देऊ शकतील..ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान १० ठिकाणी सभा घ्याव्यात, अशी विनंती प्रदेश भाजपने केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांपेक्षा सभांची संख्या जास्त असू शकेल, असे सांगण्यात येत आहे..विदर्भ-मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथे प्रत्येकी एक तर मुंबई एमएमआर परिसर तसेच कोकणात दोन सभा व्हाव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. दिवाळीनंतर सभा खऱ्या अर्थाने सुरू होतील. त्यानंतर पंतप्रधान ७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत परदेशात जाणार आहे. त्या काळात पंतप्रधान देशात नसल्याने काही सभा आधी, काही नंतर होतील. महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असल्याने मोदींनी अधिक सभा घ्याव्यात, असा मतप्रवाह आहे..Nandurbar Vidhan Sabha: निवडणुकीच्या रणधुमाळीत आश्वासनांचाच पाऊस! आदिवासी मजुरांचे स्थलांतर, बंद साखर कारखाने कळीचे मुद्दे.योगींचा दौरा ,शहांच्या बैठकामोदींच्या दौऱ्याचे नियोजन करतानाच ते जाऊ शकणार नाहीत तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा होतील. ते मेळावे घेत नियोजनावर भर देतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभांची मागणी आहे. गेल्या लोकसभेत त्यांच्या सभांची संख्या मर्यादित होती. आता केवळ महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांत निवडणुका असल्याने नेते सभांसाठी वेळ देऊ शकतील..ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.