मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता विविध राजकीय पक्षांकडून जागा वाटपाला वेग आला आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक अत्यंत अनिश्चित अशी असणार आहे. कारण राज्याच्या राजकारणातील महत्वाचे राजकीय पक्ष म्हणून दोन राष्ट्रवादी काँग्रेस, दोन शिवसेना त्याचबरोबर दोन राष्ट्रीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. यामध्ये महाविकास आणि महायुती या दोन आघाड्यांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. याव्यतिरिक्त तिसरी आघाडी देखील यंदा मैदानात आहे. पण प्रामुख्यानं मविआ आणि महायुतीतील जागा वाटपात कोणाचा फायदा आणि कोणाचं नुकसान होईल? हे जाणून घेऊयात.