मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये रस्सीखेच आता तीव्र झाली आहे. महायुतीतील पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आधीपासूनच महाविकास आघाडीला डिवचताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी लावून धरली होती.
उद्धव ठाकरेंनी देखील जाहीररित्या याबाबत भाष्य केलं आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं यावर मौन बाळगलं आहे. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशी मागणी करणाऱ्या फडणवीसांना उत्तर दिलं आहे.