मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल एक मोठा अंदाज वर्तवला गेला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवडी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येतील, असे त्यांना विश्वास आहे.