अहमदनगरच्या संगमनेरमध्ये विखे-थोरात वादाने उग्र रूप घेतले असून, सुजय विखे यांच्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे वातावरण अधिक तणावपूर्ण झाले आहे. धांदरफळ येथील भाजप कार्यकर्ते वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.