हिंगोली : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. मंगळवारी (ता. १५) शहरासह जिल्हाभरात ठिकठिकाणी लागलेले राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर उतरविण्यास सुरवात झाली. विविध ठिकाणी प्रचारासाठी रंगविलेल्या फलकांवर रंगरंगोटी करण्यात केली जात आहे.