''सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार आवाज मर्यादेचे पालन करून साउंड सिस्टीमचा मंडळांनी वापर करावा.''
कोल्हापूर : गणेश आगमन (Kolhapur Ganeshotsav) व विसर्जन मिरवणुकांवेळी आवाजाच्या मर्यादेचे पालन करून रात्री बारापर्यंत साउंड सिस्टीम, वाद्यांना परवानगी आहे; मात्र, बारानंतर कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित (Superintendent of Police Mahendra Pandit) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. जिल्ह्यात एकूण ८४२१ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.