Artificial Intelligence : ‘एआय’चा ४० टक्के नोकऱ्यांवर परिणाम; आंतररराष्ट्रीय नाणेनिधीचे भाकीत

आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) चाळीस टक्के नोकऱ्यांवर परिणाम होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) ताज्या विश्लेषणात म्हटले आहे.
artificial intelligence
artificial intelligencesakal
Updated on

AI stealing Jobs : आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) चाळीस टक्के नोकऱ्यांवर परिणाम होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) ताज्या विश्लेषणात म्हटले आहे. ‘एआय’मुळे जगभरात विषमतेचे चित्र अधिक विदारक होणार असल्याचे ‘आयएमएफ’च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांच्याकडून सांगण्यात आले. (IMF on Jobs)

‘जगभरातील नियोजनकर्त्यांनी या ट्रेंडचा गांभीर्याने विचार करूनच पुढची पावले टाकावीत तसेच या तंत्रज्ञानामुळे सामाजिक तणाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी, ‘एआय’च्या प्रसाराचे जसे फायदे आहेत तेवढीच जोखीमही त्यामुळे निर्माण होऊ शकते,’ असे जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे. ‘प्रगत देशांमध्ये ‘एआय’चा तब्बल ६० टक्के नोकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे.

कर्मचाऱ्यांना ‘एआय’चा लाभ होईल तसेच त्यामुळे त्यांची उत्पादकता देखील वाढेल,’ असे त्यांनी नमूद केले. ‘एआय’च्या स्वीकारानंतर उच्च उत्पन्न गटातील कामगार आणि तरुण कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये अचानक मोठी वाढ होईल. कमी उत्पन्न असलेले पण ज्येष्ठ कर्मचारी वेतनामानाच्याबाबतीत पिछाडीवर जातील, असे ‘आयएमएफ’कडून सांगण्यात आले.

artificial intelligence
AI Chatbot : थोडासा दबाव आणताच खोटं बोलू लागला 'एआय' चॅटबॉट; संशोधनात धक्कादायक माहिती समोर!

सुरक्षा जाळी तयार करावी लागणार

‘काही देशांना ‘एआय’चे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा जाळी तयार करावी लागेल तसेच ज्या कर्मचाऱ्यांना याचा धोका आहे त्यांना तातडीने प्रशिक्षण द्यावे लागेल. परिणामी ‘एआय’ मुळे होणारे स्थित्यंतर अधिक सर्वसमावेश होईल तसेच त्यामुळे लोकांचे रोजगारही जाणार नाहीत. हे बदल झाले तर विषमताही वाढणार नाही,’ असे जॉर्जिव्हा यांनी नमूद केले.

‘एआय’चा उत्पादनक्षेत्राला फायदा - नादिर गोदरेज

दावोस - कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) योग्य वापराने देशातील उत्पादन, आरोग्यसेवा आदी क्षेत्रांमध्ये नवी उंची गाठता येऊ शकेल, असा विश्वास ज्येष्ठ उद्योजक व गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नादिर गोदरेज यांनी येथे जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीदरम्यान व्यक्त केले. ‘एआय’मध्ये प्रक्रियांना अनुकूल करून विविध क्षेत्रांना मदत करण्याची मोठी क्षमता आहे, त्याकडे संधी म्हणून बघितले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

artificial intelligence
Humane AI Pin : तुमच्या हाताची होणार स्क्रीन, खिशाला अडकवता येणार कम्प्युटर; पुढील वर्षीपासून मिळणार डिलिव्हरी

भारत हवामानाशी संबंधित बाबींवर योग्य दिशेने वाटचाल करत असून, अंतिम मुदतीपूर्वी आपले शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करू शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीत हवामान बदल, भू-राजकीय संघर्ष, भू-आर्थिक चिंता आणि ‘एआय’ने निर्माण केलेल्या संधी आणि धोके हे चर्चेचे प्रमुख विषय आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.