नवी दिल्ली: संघर्षग्रस्त सुदानमधून सौदी अरेबियात हलवण्यात आलेल्या १२ देशांतील ६६ नागरिकांमध्ये काही भारतीय नागरिकांचा समावेश आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर नागरिकांना बाहेर काढण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सौदी नागरिक आणि इतर नागरिकांना घेऊन जाणारे एक जहाज आज जेद्दाहला पोहोचले.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी सौदी परराष्ट्रमंत्री फैसल बिन फरहान अल सौद यांच्याशी सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्याबाबत चर्चा केली.
दरम्यान सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले की, आमच्या नेतृत्वाने दिलेल्या निर्देशांनुसार, सुदानमधून आमच्यासोबत मैत्रीपूर्ण आणि बंधुभावाचे संबंध असलेल्या देशातील, राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांसह अनेक नागरिकांना सुरक्षितरित्या देशाच्या बाहेर काढताना आम्हाला आनंद होत आहे.
जेद्दाह येथे पोहोचलेल्यांमध्ये 15 एप्रिल रोजी लढाई सुरू असताना खार्तूमहून उड्डाण करण्याच्या तयारीत असताना गोळीबार झालेल्या सौदी प्रवासी विमानाच्या क्रूचा समावेश आहे, अशी बातमी एएफपीने अल-एखबरियाच्या हवाल्याने दिली आहे.
माध्यमांनुसार, वाहनांच्या ताफ्याने निर्वासितांना पोर्ट सुदानला नेले तेथून ते जहाजातून जेद्दाहला रवाना झाले. रमजानच्या पवित्र महिन्याच्या अखेरीस असलेल्या ईदनिमित्ताने अधिकारी आणि सैनिकांनी निर्वासितांचे मिठाईचे वाटप करून स्वागत केले.
सुदानचे लष्करप्रमुख अब्देल फताह अल-बुरहान आणि शक्तिशाली निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) चे नेतृत्व करणारे त्यांचे उप-प्रतिस्पर्धी मोहम्मद हमदान डागलो यांच्यातील आतापर्यंत शेकडो सैनिकांसह नागरिकांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी राजधानीच्या अनेक भागात जोरदार गोळीबार, मोठा स्फोट आणि लढाऊ विमानांचा आवाज येत होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.