नेपाळ बस दुर्घटना
वरणगाव (जि.जळगाव) : नेपाळमध्ये बस नदीत कोसळून जळगाव जिल्ह्यातील २७ जणांचा मृत्यू झाला. एकेका कुटुंबातील अनेक सदस्य या अपघातात मृत्युमुखी पडले. वरणगावच नव्हे तर दर्यापूर, तळवेल या गावांवरही शोककळा पसरली आहे. वरणगावात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी अनेक घरांमध्ये चुली पेटल्या नाहीत. मृतदेहाची वाट पाहत नागरिक शोकमग्न अवस्थेत होते. मृतांच्या घरांजवळ नातलग, मित्रपरिवार, स्नेहींनी दिवसभर गर्दी केली होती. ग्रामस्थांचा प्रचंड आक्रोश दिवसभर सुरु होता.