मोदी आल्यापासून पाकिस्तानवर संकट! आत्मघातकी हल्ले वाढले, मृत्यूंच्या संख्येत २२८ टक्क्यांनी वाढ

शेजारी राष्ट्र पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आत्मघातकी हल्ल्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. २०२३ मध्ये सर्वाधिक आत्मघातकी हल्ले झाले आहे. यातील जवळपास अर्ध्या हल्ल्यांमध्ये सुरक्षा दलांना निशाणा बनवण्यात आलं आहे.
terror attack in pakistan increased in on narendra modi tenure said don report
terror attack in pakistan increased in on narendra modi tenure said don report
Updated on

नवी दिल्ली- शेजारी राष्ट्र पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आत्मघातकी हल्ल्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. २०२३ मध्ये सर्वाधिक आत्मघातकी हल्ले झाले आहे. यातील जवळपास अर्ध्या हल्ल्यांमध्ये सुरक्षा दलांना निशाणा बनवण्यात आलं आहे. पाकिस्तानची प्रसिद्ध वृत्तसंस्था डॉनने यासंदर्भातील रिपोर्ट दिलाय. रिपोर्टमध्ये १० वर्षांमध्ये या वर्षी सर्वाधिक हल्ले झाले आहेत. (terror attack in pakistan incresed in on narendra modi tenure said don report)

इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्योरिटी स्टडीज (PICSS) चा हवाला देत डॉनने हा रिपोर्ट समोर आणला आहे. २०२३ मध्ये तब्बल २९ आत्मघातकी हल्ले झाले आहेत. यात ३२९ लोकांचा मृत्यू झालाय, तर ५८२ लोक जखमी झालेत. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, मृत्यू झालेल्यांमध्ये ४८ टक्के सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २०१३ नंतरचा हा सर्वाधिक आकडा असल्याचं सांगण्यात येतंय. २०१३ मध्ये ४७ आत्मघातकी हल्ल्यांमध्ये ६८३ लोकांचा मृत्यू झाला होता.

terror attack in pakistan increased in on narendra modi tenure said don report
Israel-Hamas War: ख्रिसमसच्या दिवशी इस्राइलचा मोठा हवाई हल्ला, गाझामध्ये बॉम्बफेक, मुलांसह 70 लोक ठार

२०२२ च्या आकड्यांची तुलना केल्यास २०२३ मध्ये हल्ल्यांची संख्या ९३ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच मृतांच्या संख्येमध्ये तब्बल २२६ टक्क्यांनी वाढ झालीये. तसेच जखमी होणाऱ्या लोकांच्या संख्येत १०१ टक्क्यांनी वाढ झालीये. सध्या पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता आहे. त्याच्यामुळे हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याची शक्यता आहे.

terror attack in pakistan increased in on narendra modi tenure said don report
'सागराच्या तळातूनही शोधून काढू'; INS इंफाळच्या उद्घाटनावेळी राजनाथ सिंहांचा ड्रोन हल्ला करणाऱ्यांना इशारा

रिपोर्टनुसार, दहशतवाद्यांचे प्राबल्य असलेल्या खैबर पख्तूनख्वामध्ये सर्वाधिक हल्ले झालेत. येथील २३ घटनांमध्ये २५४ लोकांचा मृत्यू झालाय आणि ५१२ लोक जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमध्ये एकूण ५ हल्ले झालेत. यात ६७ लोकांचा मृत्यू तर ५२ लोक जखमी झालेत. सिंध प्रांतात एक हल्ला झाला असून त्यात ८ जणांना मृत्यू झालाय, तर १८ जण जखमी झालेत.

रिपोर्टनुसार, २०१४ मध्ये आत्मघातकी हल्ले ३० होते, त्यात घट होऊन २०१९ मध्ये ते केवळ तीन झाले होते. पण, २०२२ मध्ये त्यात अचानक वाढ झालीये. २०२२ मध्ये १५ आत्मघातकी हल्ले झाले. ज्यात १०१ लोकांचा मृत्यू झाला आणि २९० लोक जखमी झाले. २०२३ मध्ये हल्ल्यांमध्ये आणखी वाढ झालीये.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.