श्राद्धपक्षातील आरोग्य

श्री गणरायांना निरोप दिल्या दिल्या सुरुवात होते ती श्राद्धपक्षाला. श्राद्धपक्ष किंवा पितृपक्ष हा भाद्रपदाच्या प्रतिपदेला सुरू होतो आणि सर्वपित्री अमावस्येला संपतो.
Shraddha Paksha sarvapitri amavasya
Shraddha Paksha sarvapitri amavasyasakal
Updated on

- डॉ. मालविका तांबे

श्री गणरायांना निरोप दिल्या दिल्या सुरुवात होते ती श्राद्धपक्षाला. श्राद्धपक्ष किंवा पितृपक्ष हा भाद्रपदाच्या प्रतिपदेला सुरू होतो आणि सर्वपित्री अमावस्येला संपतो. या काळाला आपल्याकडे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व तर आहेच. पण यात असलेले बरेच नियम आयुर्वेदाला धरूनही असलेले दिसतात.

आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतू आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करत असतो. निसर्गात होणाऱ्या बदलांनुसार आपल्या वागणुकीत अर्थात आहार व विहारात आपल्याला बदल करणे अपेक्षित असते. या सगळ्या नियमांना ऋतुचर्या असे म्हटले जाते. श्राद्धपक्षाचा विचार केला तर या वेळी वर्षाऋतूचे शेवटचे काही दिवस असतात तसेच शरद ऋतूची चाहूल लागलेली असते. श्राद्धपक्षात वर्षा ऋतूत असलेला पाऊस व त्यामुळे वातावरणात आलेला दमटपणा तसेच शरदात असलेले मोकळे आकाश व सूर्याची किरणे या दोन्हीमुळे लपंडाव होत असलेला दिसतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.