Gulabrao Patil News : विमा कंपनी अधिकाऱ्यांना ‘शिंगाडे’ दाखविण्याची वेळ; पालकमंत्री पाटील यांचा इशारा

Gulabrao Patil
Gulabrao Patilesakal
Updated on

Gulabrao Patil News : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रावेर, यावल, सावदा, चोपडा या परिसरात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्‍यांनी या नुकसानीची माहिती सादर करूनही त्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही.

त्यामुळे आता विमा कंपनी अधिकाऱ्यांना ‘शिंगाडे’ दाखविण्याची वेळ आली आहे. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्‍यांचा अंत पाहू नका, असा गर्भित इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. (Guardian Minister gulabrao Patil warning to banana insurance company officials jalgaon news)

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी नुकसानीमुळे मेटाकुटीला आला आहे. आसमानी संकटासह सुलतानी संकटांचादेखील शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया झाली आहे.

विमा कंपन्यांनाही नुकसानीबाबतची माहिती देण्यात आली आहे. मागील आठवड्यात पालकमंत्री पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनासह विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीदेखिल शासनस्तरावर यासंबंधी पाठपुरावा केला होता. बैठकीत पालकमंत्र्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते.

Gulabrao Patil
Gulabrao Patil News : नोकरदार वराच्या अपेक्षेतून सामाजिक असंतुलन : गुलाबराव पाटील

तरीदेखिल विमा कंपन्यांकडून अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.

७७ हजार शेतकऱ्यांनी काढला विमा

जिल्ह्यात ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्‍यांनी एआयसी अर्थात अ‍ॅग्रीकल्चरल इंशुरंस कंपनीकडून केळी पिक विमा काढला आहे. हे सर्व शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत.

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतही पालकमंत्री पाटील यांनी पडताळणी न करता केळी उत्पादकांना तातडीने मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीदेखिल विमा कंपन्यांनी याबाबत कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आता शिंगाडेच दाखविण्याची वेळ आली आहे.

Gulabrao Patil
Gulabrao Patil : पाच वर्षांत तीन शपथविधी, तीनही वेळा आपण उपस्थित; गुलाबराव पाटलांचं विधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.