Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता, पोलिस दलाची ‘कमांड’ सुटल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात भुसावळ, अमळनेर व चाळीसगावची गुन्हेगारी हाताबाहेर गेली आहे. नुसत्या जळगाव शहराचा विचार करता सहा महिन्यांत सहा खून व आठ बलात्काराच्या घटना पोलिस रेकॉर्डवर आहेत. ज्यांच्या तक्रारी होऊ शकल्या नाहीत किंवा पोलिसांच्या मेहरबानीमुळे दाखल न होणारे किरकोळ गुन्हे वेगळे. खाकीचा धाक आता गुन्हेगारीत राहिलेला नाही, असे बोलले जात आहे. (6 murders and 8 cases of molestation in district )