चाळीसगाव ः सुरवातीपासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा दावा असलेली येथील विधानसभेची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक अपक्ष लढवावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजीव देशमुख यांच्याकडे केली. कार्यकर्त्यांनी आम्ही उन्मेष पाटलांचा प्रचार आज तरी करणार नाही, असा पवित्रा घेत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. ()