Jalgaon News: तीस वर्षे सत्ता असूनही 50 टक्के गावे सिंचनाविना! एकनाथ खडसे यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

Jalgaon News : ज्यांनी तीस वर्षे आमदारकी उपभोगली, तालुक्यात दोन दोन नद्या असूनही मुक्ताईनगर तालुक्यातील ५० टक्के गावे अद्यापही का पूर्ण सिंचनाखाली येऊ शकलेली नाहीत, असा सवाल आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला
Chandrakant Patil
Chandrakant Patilesakal
Updated on

मुक्ताईनगर : मुंढोळदे ते सुलवाडी पुलासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला असून, जमिनी अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे. हा पूल लवकरात लवकर पूर्ण होईल. मोठी कामे करण्यासाठी वेळ लागतोच, परंतु एकनाथ खडसेंच्या काळातील म्हणजे २०१६ मधील कामे आज २०२४ पर्यंत सुद्धा पूर्ण होऊ शकलेली नाही.

ज्यांनी तीस वर्षे आमदारकी उपभोगली, तालुक्यात दोन दोन नद्या असूनही मुक्ताईनगर तालुक्यातील ५० टक्के गावे अद्यापही का पूर्ण सिंचनाखाली येऊ शकलेली नाहीत, असा सवाल आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. आमदार एकनाथ खडसेंच्या आरोपांवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. (Chandrakant Patil reply to Khadse criticism)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.