Crop Insurance : शेतकऱ्यांना पीकविम्याचा दिलासा; अमळनेर तालुक्यात 68 हजार नुकसानग्रस्तांना लाभ

Jalgaon News : अमळनेर तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम २०२३ मधील उर्वरित ७५ टक्के पीकविमा मंजूर झाला.
Crop Insurance
Crop Insuranceesakal
Updated on

अमळनेर : तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम २०२३ मधील उर्वरित ७५ टक्के पीकविमा मंजूर झाला असून, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून ६८ हजार ८५० शेतकऱ्यांना जवळपास ४२ कोटी रकमेचा पीकविमा मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी दिली. (In Amalner taluka 68 thousand farmers benefited from Crop Insurance)

जळगाव येथे मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या पीकविम्याची रक्कम वितरित करण्याचे आदेशही झाले असून, ही रक्कम ऑगस्ट अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती भागवत पाटील यांनी दिली. दरम्यान, या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भागवत पाटील यांनी म्हटले आहे.

की अमळनेर तालुक्यातील आठही महसूल मंडळांना २५ टक्के अग्रीम रक्कम यापूर्वीच जवळपास ५७ हजार शेतकरी बांधवांच्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट जमा झालेले आहेत तर फेब्रुवारी, मार्च महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानीचे पंचनामे झालेल्या १ हजार ७१४ शेतकरी बांधवांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आलेले आहेत.

आता उंबरठा उत्पन्न व पीक कापणी प्रयोगाच्या अंती अमळनेर तालुक्यातील सर्व आठही महसूल मंडळातील उर्वरित ७५ टक्के रकमेसाठी ५५ हजार ८२४ शेतकरी पात्र झाले असून, त्यांच्या खात्यावर जवळपास ३७ कोटी रुपये जमा होतील. (latest marathi news)

Crop Insurance
Jalgaon Rain Damage Crop : ‘ती’ 69 गावे भरपाईच्या प्रतीक्षेत! पारोळा तालुक्यातील नुकसानग्रस्तांची प्रशासनाला आर्त हाक

तर अमळनेर मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील बहादरपूर व शेळावे बुद्रुक या दोन महसूल मंडळातील १२ हजार ८२६ पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावर जवळपास ६ कोटी रुपये ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत ओरिएन्टल इन्शुरन्स प्रा. लि. कंपनीकडून शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होतील. म्हणजेच एकूण ६८ हजार ६५० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

खरीप पीकविम्यातून ८४ कोटी

मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नानी अमळनेर विधानसभा मतदार संघात खरीप पीक विमा २०२३-२४ या हंगामात शेतकरी बांधवांना एकूण ८४ कोटी ५१ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. हा खरीप पीकविमा मंजूर झाल्यामुळे खोट्या वल्गना करणाऱ्या विरोधकांना चपराक बसली असून.

यावरून महायुती सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचेही स्पष्ट झाले असल्याचे पत्रकात म्हटले आहे. मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या वतीने महायुती सरकार तसेच मंत्री अनिल पाटील यांचे आता जाहीर आभार भागवत पाटील यांनी मानले आहेत.

Crop Insurance
Jalgaon Municipality News : महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार कालबद्ध पदोन्नती; शुक्रवारपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com