Jalgaon News : रेल्वे मार्गाशेजारी बांबू लागवडीस संमती! जिल्हाधिकाऱ्यांना रेल्वेच्या भुसावळ विभागाचे पत्र

Jalgaon News : रेल्वेच्या जागेत बांबू लावू देण्याबाबत ना हरकत पत्र (एनओसी) द्यावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी भुसावळ रेल्वे विभागाला दिले होते.
Bamboo
Bambooesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील तापमान कमी व्हावे, सोबतच ग्रामपंचातीचे उत्पन्न वाढावे, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून पाचोरा ते जामनेरदरम्यान रेल्वे मार्गाशेजारील रेल्वेच्या जागेत बांबूलागवड होणार आहे. रेल्वेच्या जागेत बांबू लावू देण्याबाबत ना हरकत पत्र (एनओसी) द्यावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी भुसावळ रेल्वे विभागाला दिले होते. त्यावर रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांनी ‘एनओसी’ दिली आहे. (Jalgaon Permission to plant bamboo next to railway line)

पाचोरा-जामनेर गेज परिवर्तन व विस्तारीकरणाचे काम मध्य रेल्वे भुसावळच्या बांधकाम विभागातर्फे सुरू आहे. या कामासाठी लोकेशन सर्व्हेचे काम बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. काही ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे मार्गावर अडथळा न येणाऱ्या जागेवर पाचोरा ते जामनेर स्थानकापर्यंत रेल्वेच्या जमिनीवर मनरेगा योजनेंतर्गत वृक्षलागवडीसाठी तांत्रिक बाबी तपासून घेतल्या आहेत.

रेल्वेच्या जागेत बांबूची लागवड केल्यानंतर रेल्वेला अडथळा येत असल्यास अशा झाडे काढून टाकणे किंवा काही झाडे काढण्यात येतील. रेल्वेचे साइट अभियंता स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार हा निर्णय घेतील. यामुळे बांबू झाड लावल्यानंतर फांद्या तोडणे व छाटण्याचे अधिकार रेल्वेला असतील. तशा सूचना ‘मनरेगा’च्या संबंधित अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत, असे रेल्वेने पत्रात म्हटले आहे. (latest marathi news)

Bamboo
Jalgaon News: केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूशखबर! नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ; पालकमंत्री पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

ग्रामपंचायतीला बांबूचे उत्पन्न मिळेल

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अंतर्गत जामनेर ते पाचोरा स्थानकादरम्यान रेल्वेच्या जागेत बांबूलागवड संबंधित ठिकाणच्या ग्रामपंचायतीतर्फे केली जाईल. जागा रेल्वेची असेल. मात्र, तीन वर्षांनंतर बांबू विकून ते उत्पन्न संबंधित ग्रामपंचायती घेतील.

कांदाचाळींना बांबूची आवश्‍य असतात. नाशिक जिल्ह्यात कांदाचाळी आहेत. त्यांना बांबूंची विक्री करता येईल. लवकरच बांबूलागवडीचे नियोजन जिल्हा परिषद करेल. त्यांना त्याबाबत सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

Bamboo
Nashik News : नांदूर-मानूर परिसरातील गाळ मिश्रित पाणी; शुद्ध पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.