जळगाव : मुंबई, पुणे, नागपूरसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांचे आरक्षण आताच फुल्ल झाले आहे. सध्या चार महिन्यांपासून प्रवासी ‘वेटिंग’वर आहेत. असे असताना ऐन दिवाळी, पर्यटन हंगामाच्या तोंडावर रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना धक्का दिला आहे. रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल केले आहेत. या नियमानुसार आता १२० दिवस आधी नव्हे तर केवळ ६० आधी रेल्वेचे तिकीट आरक्षण करता येणार आहे. (Railway reservation full booking period will increase from 120 to 60 days )