Raigad: बोगस बियाण्यांमुळे भातपीक वाया; शेकडो शेतकऱ्यांचा संताप

Raigad: बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत मातीमोल झाली आहे.
Bogus seeds ruin farmers' hard work, leading to widespread outrage among the community
Bogus seeds ruin farmers' hard work, leading to widespread outrage among the communitySakal
Updated on

पाली: सुधागड तालुक्यातील आपटवणे येथील शेकडो शेतकरी संकटात सापडले आहेत. अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता बियाण्यात झालेल्या फसवणुकीने रडकुंडीला आणले आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत मातीमोल झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

हातातोंडाशी आलेला घास गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आपटवणे येथील शेतकऱ्यांनी पाली येथील कृषी सेवा केंद्रामधून जया भात बियाणे खरेदी केले. मात्र, ९० टक्क्यांपेक्षा जास्त बियाणे खेड, काळी कचरी, भेळ असल्यामुळे आलेल्या खराब भात पिकाला भाव मिळणार नाही. अतिशय कष्टाने आणि खर्चाने केलेली लागवड मोठ्या नुकसानीत गेली. तर, कृषी सेवा केंद्राची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Bogus seeds ruin farmers' hard work, leading to widespread outrage among the community
Dairy Farmers : आम्हाला अनुदानाची कुबडी नकोय, तर कष्टाच्या घामाचा दर हवाय!

दरवर्षी शेतकरी वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्रातून भात बियाणे घेतो. यंदाच्या मोसमात येथील शेतकऱ्यांनी जे बियाणे घेतले, ते बियाणे लागवडीच्या तीन महिन्यांनंतर पीक लोंबीवर आले. मात्र, या भात शेतीत ९९ टक्के पिकावर खेड आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले असून, आता ओला दुष्काळदेखील आला आहे. यातच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, शासनाने जलद पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी

--- सुधागड कृषी मित्र संघटना

मोठे आर्थिक नुकसान

आम्हा सर्व शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर आहे. आम्ही वर्षभर जे काही तुटपुंजी साठवतो, तीच शेती लागवडीत टाकतो. मात्र, आता बियाण्यात फसवणूक झाल्याने पीक हातचे गेले असून, खर्चही वाया जाणार आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने आम्हाला तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी वैशाली केदारी यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.