कारागृहात फुलला भाजीपाला; पक्के कैद्यांचं कष्ट फळाला

रत्नागिरी खुला तुरुंग; थेट विक्रीतून १५ लाख शासन तिजोरीत जमा, कंपाऊंडवर स्टॉल मांडणी
ratnagiri jail
ratnagiri jailsakal
Updated on

रत्नागिरी : राज्यातील पुणे, कोल्हापूर, ठाणे, पैठणनंतर ४ वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाला ‘खुल्या कारागृहा’चा दर्जा मिळाला. त्यामुळे पंधरा वर्षे बंद पडलेला मळा कारागृहाच्या साडेपाच एकर जमिनीमध्ये पुन्हा फुलू लागला. गेल्या वर्षी कैद्यांनी मातीतून सोने फुलवत पाले-भाजीच्या माध्यमातून वर्षाला पंधरा लाखांचे उत्पन्न मिळविले. ही रक्कम शासन दरबारी जमा केली आहे. यावर्षीही शिक्षा संपत आलेले ७ पक्के कैदी कारागृहाला मिळाले असून, त्यांच्यामार्फत पुन्हा कारागृहाच्या परिसरात शेती फुलणार आहे.

रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृह म्हणून ख्याती असलेले रत्नागिरी कारागृह ‘खुले कारागृह’ होणेसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होता. २०१८ ला यश आले आणि शिक्षा संपत आलेले १२ पक्के कैदी कारागृहाला मिळाले. त्यांच्यामार्फत शेती, भाजी-पाला, आदीचे उत्पादन घेऊन शासनाला उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू झाला. यामुळे कैद्यांना कामेही मिळणार असून चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची शिक्षा कमी होण्यास मदत होणार आहे.

खुल्या कारागृहाच्या संकल्पनेतून पक्क्या कैद्यांकडून गेल्यावर्षी शेती फुलविली होती. यामध्ये हिरवा मटार, दोडका, पडवळ, माठ व अन्य पालेभाज्या घेत्या जात होत्या. कारागृहाच्या कंपाऊंडवर स्टॉल मांडून हा ताजा भाजी-पाला विकला जात होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळला. यातून महिन्याला सुमारे १ ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळत होते.

शिक्षा झालेले हे पक्के कैदी

न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली नाही, असे कैदी हे कच्चे कैदी असतात. शिक्षा झालेले हे कैदी हे पक्के कैदी असतात. कारागृहाला मिळालेले ७ कैदी हे शिक्षा झालेले आहेत. त्यांची शिक्षा आता संपत आली आहे. त्यांच्याकडून शेतीची कामे करून घेतली जातात. त्यांची वर्तणूक पाहून त्यांच्या शिक्षेचा कालावधी कमी केला जातो.

गेल्यावर्षी कारागृहाच्या शेत जमिनीतून भाजी-पाल्याच्या माध्यमातून महिन्याला लाख ते सव्वा लाख उत्पन्न घेतले. यंदा शिक्षा संपत आलेले ७ कैदी मिळाले आहेत. त्यांच्या माध्यमातून खुल्या कारागृहाच्या संकल्पनेतून शेती फुलवली जाणार आहे.

-अमेय पोतदार, तुरुंग अधिकारी

एक नजर..

कारागृहाची शेतजमीन आहेः ५ हेक्टर ८१ गुंठे

जिरायती जमीन ः २ एकर ३० गुंठे

जमीन पडीकः ३ हेक्टर

एक दृष्टिक्षेप...

आंबे, फणस, नारळ लिलावातूनच वर्षाला उत्पन्न १७ हजार

भाजी-पाला विक्रीतून महिन्याला उत्पन्नः

१ लाख २५ हजार

गेल्या वर्षी कारागृहाच्या शेतीतून उत्पन्नः

१५ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.