रत्नागिरी - ईयर टॅगिंग नसलेली जनावरे विक्रीस प्रतिबंध

रत्नागिरी - ईयर टॅगिंग नसलेली जनावरे विक्रीस प्रतिबंध

Published on

ईयर टॅगिंग नसलेली
जनावरे विक्रीस प्रतिबंध

बेकायदा कत्तली, वाहतूक रोखणार
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १० : जनावरांची बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी ''ईयर टॅगिंग'' शिवाय इतर राज्यातील जनावरे महाराष्ट्रात येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे १ जूनपासून ''ईयर टॅगिंग'' नसलेली जनावरे बाजार समित्या, आठवडे बाजार आणि गावागावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध केल्याने बेकायदा कत्तलींना आळा बसणार आहे.
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशनअंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीत ''ईयर टॅगिंग''च्या (१२ अंकी बारकोड) नोंदी घेण्यात येत आहेत. त्यात जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. पशुवैद्यकीय संस्थांमार्फत जनावरांच्या कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यामुळे सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होईल. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगर पालिका, महानगरपालिका यांना पशुधनाची ''ईयर टॅगिंग'' करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक आहे. १ जून २०२४ नंतर ''ईयर टॅगिंग'' शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा मिळणार नाही तसेच कत्तलखान्यात टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगीही मिळणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.