जनधनअंतर्गत जिल्ह्यात वर्षात २४ हजार खाती

जनधनअंतर्गत जिल्ह्यात वर्षात २४ हजार खाती

Published on

पान ३


जनधनअंतर्गत जिल्ह्यात
वर्षात २४ हजार खाती
रत्नागिरी, ता. ११ : प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये जिल्ह्यात वर्षभरात २४ हजार खातेदारांची वाढ झाली आहे. या योजनेमध्ये जिल्ह्यात गत आर्थिक वर्षाच्या अखेर ४ लाख ३ हजार खाती होती. यावर्षी त्यांची संख्या ४ लाख २७ हजारांवर पोहोचली आहे. वर्षभरात या प्रकारच्या खात्यांमध्ये २४ हजार खात्यांची भर पडली आहे. त्या संदर्भातील आकडेवारी अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापकांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की, ३१ मार्च २०२३ अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक बँकांमध्ये ४ लाख २ हजार ९९३ एवढी जनधन खाती नोंदवण्यात आली. ३१ मार्च २०२४ अखेर त्यात भर पडली आणि त्यांची संख्या ४ लाख २७ हजार ५०५ वर जाऊन पोहोचली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.