विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी 
हवी ‘एक खिडकी’ योजना

विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी हवी ‘एक खिडकी’ योजना

Published on

87204

विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी
हवी ‘एक खिडकी’ योजना

रियाज खान ः तहसीलदारांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ : राज्यात दहावी व बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, विद्यार्थी पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांना सर्व दाखले वेळेत उपलब्ध करण्यासाठी तहसील कार्यालयात ‘एक खिडकी’ योजना सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेनेचे अल्पसंख्याक उपजिल्हाध्यक्ष रियाज खान यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
खान यांनी निवेदनात म्हटले आहे, दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते. हे दाखले मिळविताना विद्यार्थ्यांची बरीच दमछाक होते. यासाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांना सर्व दाखले एकाच ठिकाणी व वेळेत उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.