त्या सामान्य कुटुंबांना घरकूल योजनेचा लाभ

त्या सामान्य कुटुंबांना घरकूल योजनेचा लाभ

Published on

ratchl२८४.jpg
२४N१४६९४
ः चिपळूण ः टेरव येथील धोकादायक बनलेली घरे

‘त्या’ कुटुंबांना ‘घरकूल’चा लाभ द्या

किशोर कदम ः पावसात मातीची घरं बनली धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ ः तालुक्यातील टेरव येथील पावसात काही घरांचे नुकसान झाले. जीर्ण झालेली ही घरे धोकादायक बनली असून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोकादायक बनलेल्या सामान्य कुटुंबांना घरकूल योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी टेरव सरपंच किशोर कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुसळधार पावसात टेरव येथील विविध वाड्यांतील ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झालेले आहे. येथील पाच ग्रामस्थांची घरे अतिशय जीर्ण झाली असून, ती कोसळण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामस्थांनी मागणी करूनही त्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही. टेरव भारतीवाडी येतील सचिन म्हालीम, सुतारवाडीतील विठ्ठल वास्कर आणि सुधाकर वास्कर, कुंभारवाडी येथील बबन शिवणकर, दत्तवाडी येथील उमेश कदम यांची घरे धोकादायक बनली आहेत. या कुटुबांमध्ये वयोवृद्ध लोकं असून, घरे कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोकादायक घरे बनलेल्या कुटुंबांना शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ द्यावा याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अवगत करावे, अशी मागणी सरपंच कदम यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.