T20 World Cup Final: ऋषभ पंतच्या चतुराईचा झाला फायदा अन् क्लासेनची गेली विकेट, गावसकरांनी सांगितलं कोणता क्षण ठरला महत्त्वाचा

Rishabh Pant: टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऋषभ पंतच्या डावपेचांही भारताला फायदा झाल्याचं गावसकरांनी सांगितलं असून त्यांनी यासाठी उदाहरणही दिलं आहे.
Sunil Gavaskar | T20 World Cup 2024
Sunil Gavaskar | T20 World Cup 2024Sakal

Sunil Gavaskar on Rishabh Pant: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या अंतिम सामन्यात सात धावांनी हरवले. ह्या सामन्यात विराट कोहली आणि अक्षर पटेल आणि शिवम दुबेची फलंदाजी, तसेच हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांची गोलंदाजी तर सूर्यकुमार यादवचा कॅच हे सर्व उल्लेखनीय ठरले.

परंतु यासर्वांमध्ये भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ऋषभ पंतचे डावपेचही अधोरेखित केले, जे महत्त्वाचे ठरले. त्यांनी सांगितले की, याचे उदाहरण देखील ते दिले.

Sunil Gavaskar | T20 World Cup 2024
Rohit Sharma: टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही रोहितच्या पत्नीला आहे एका गोष्टीचं दु:ख; सोशल मीडिया पोस्टमधून केलं स्पष्ट

सुनील गावसकर यांनी स्पोर्टस् टुडेला सांगताना म्हटले, "मला तुमचे लक्ष वेगळ्या गोष्टीकडे वेधायचे आहे, जे खूप महत्त्वाचे आहे. काहीवेळा लहान डावपेच काम करतात आणि सामन्याचा निकाल बदलू शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा दोन गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना, फलंदाजांना त्यांची लय तोडण्यासाठी थोडा वेळ लागतो.

ऋषभ पंतने २०२४ च्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये असेच केले होते, जेव्हा हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर चांगली फलंदाजी करत होते त्यावेळी त्यानी फिजिओला बोलावून उपचार घेतले होते."

Sunil Gavaskar | T20 World Cup 2024
T20 World Cup: आनंद गगनात मावेना! टीम इंडियाच्या विश्वविजयानंतर खेळाडूंचं भन्नाट सेलिब्रेशन, BCCI ने शेअर केला अनसीन Video

गावसकर पुढे म्हणाले, "ऋषभ पंतला फिजिओने गुडघ्यावर एक पट्टा लावला आणि या दरम्यान खेळ सुमारे ४-५ मिनिटे थांबला. याचा फायदा असा झाला की क्लासेनची लय तुटली आणि कर्णधार व गोलंदाजाला थोडा वेळ मिळाला.'

'क्लासेन आणि मिलरची लय तुटताच क्लासेन पुढच्याच चेंडूवर बाद झाला. मागील षटकात बुमराहने केवळ चार धावा दिल्या होत्या. क्लासेन आणि मिलरवर थोडंसं दडपण होतं, त्यामुळे त्यांनी बाहेरचा चेंडू मारला आणि तिथेच हार्दिक पंड्याचा चेंडू क्लासेनसाठी काळ ठरला त्यानंतर भारताला महत्त्वाचं यश मिळालं."

या सामन्यात भारताने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून क्लासेनने ५२ धावांची खेळी केली होती. तसेच मिलरने २१ धावांची खेळी केली होती. पण त्यांन संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. दक्षिण आफ्रिका संघाने २० षटकात ८ बाद १६८ धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com