T20 World Cup: तेव्हा श्रीसंत, तर आता सूर्या...! भारताला दोन टी20 वर्ल्ड कप जिंकून देणारे ते विनिंग कॅच, पाहा Video

Suryakumar Yadav - Sreesanth Catch: भारतीय संघाने आत्तापर्यंत दोन टी२० वर्ल्ड कप जिंकले. या दोन्ही वर्ल्ड कप विजयांमध्ये दोन झेल खूप महत्त्वाचे ठरले.
Suryakumar Yadav - Sreesanth Catch
Suryakumar Yadav - Sreesanth CatchSakal

Team India T20 World Cup Win: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (२९ जून) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पार पडला. बार्बाडोसला झालेल्या या अंतिम सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.

भारताला हा वर्ल्ड कप जिंकून देण्यात क्षेत्ररक्षकांचेही मोलाचे योगदान राहिले. मोक्याच्या क्षणी पकडलेले झेल महत्त्वाचे होते. त्यातही अखेरच्या षटकात सूर्यकुमार यादवने घेतलेला डेव्हिड मिलरचा झेल सामना पालटवणारा ठरला.

Suryakumar Yadav - Sreesanth Catch
T20 World Cup: निवृत्ती घेण्यापूर्वी रोहित-कोहलीने रचला इतिहास; आजपर्यंत कोणालाच न जमलेला पराक्रम करून दाखवलाय

या सामन्यात अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला १६ धावांची गरज होती. यावेळी मिलर स्ट्राईकवर होता. त्याने हार्दित पांड्याविरुद्ध पहिल्याच चेंडूवर मोठा शॉट खेळला. पण लाँग ऑफच्या बाऊंड्री लाईन जवळ सूर्यकुमार यादवने अफलातून झेल घेतला.

त्यामुळे मिलर २१ धावांवर बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेची अखेरची आशाही संपली. जर हा षटकार गेला असता, तर कदाचीत भारताला हा सामनाही गमवावा लागला असता. त्यामुळे हा झेल महत्त्वाचा ठरला.

विशेष म्हणजे यापूर्वी जेव्हा भारताने २००७ साली पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हाही असाच एस श्रीसंतने घेतलेला झेल महत्त्वाचा ठरलेला. तेव्हा अंतिम सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी अखेरच्या ४ चेंडूत ६ धावांची गरज होती.

त्यावेळी त्यांच्या ९ विकेट्स गेलेल्या होत्या, त्यामुळे भारताला एका विकेटची गरज होती. पण त्यावेळी पाकिस्तानकडून खेळपट्टीवर स्थिरावलेला मिस्बाह-उल-हक स्ट्राईकवर होता.

पण याचवेळी जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर मिस्बाहने स्कुप शॉट खेळला, पण श्रीसंतने त्याचा झेल घेतला आणि मिस्बाह ४३ धावांवर बाद झाला. यासह भारताने पहिल्या टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले होते.

एकूणच भारताला दोन टी२० वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी हे दोन झेल अत्यंत महत्त्वाचे ठरले.

भारताचा अंतिम सामन्यात विजय

दरम्यान, शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या होत्या. त्यानंतर १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com