IND vs SA Video Viral: भारतीय चाहत्यांचे मोठं मन! अवघ्या 7 धावांनी फायनल हारलेल्या द. आफ्रिकन खेळाडूं 'असं' केलं चीअर

Indian fans console South Africa team: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अवघ्या ७ धावांनी भारतीय संघाकडून पराभूत झाल्यानंतर निराश झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे भारतीय चाहते सांत्वन करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
South Africa Cricket Team
South Africa Cricket TeamSakal

T20 World Cup 2024, India vs South Africa: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाला अवघ्या ७ धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारताने दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.

दरम्यान, विजयाच्या जवळ येऊनही पहिला वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न दक्षिण आफ्रिकेचे भंगले. त्यामुळे त्यांचे खेळाडू अत्यंत निराश झाले होते. एकिकडे विश्वविजयामुळे भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात पाणी असताना दुसरीकडे हाताशी आलेला विजय हुकल्याने दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू रडताना दिसले होते.

South Africa Cricket Team
IND vs SA Test: भारताच्या पोरींनी दक्षिण आफ्रिकेला लोळवलं! चेन्नई कसोटी 10 विकेट्सने जिंकली

दरम्यान, निराश झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे भारतीय चाहत्यांनीही सांत्वन केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत झाल्यानंतरही क्रिकेटविश्वातून मोठ्याप्रमाणात प्रेम मिळाले आहे.

याचा प्रत्येय या व्हिडिओमधून आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू त्यांच्या कुटुंबासह संघाच्या बसमध्ये जात असताना तिथे असलेल्या चाहत्यांनी त्यांना 'वी लव्ह यू, साऊथ आफ्रिका','तुम्ही चांगले खेळलात' असं म्हणत चिअर केले.

यावेळी चाहत्यांनी दाखवलेल्या या प्रेमाचा दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू स्वीकार करतानाही दिसले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

South Africa Cricket Team
T20 World Cup 2024: कॅच घेताना सूर्याचा पाय बाऊंड्रीला लागला होता? दक्षिण आफ्रिकेच्याच दिग्गजाने दिलं उत्तर

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाने वरिष्ठ पातळीवरील कोणत्याही वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्यांना पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी होती.

अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ विजयाच्या जवळही आला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या चार षटकात केलेली गोलंदाजी महत्त्वाची ठरली.

अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या होत्या. त्यानंतर १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com