Yuvraj Singh: टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला युवीचा 'गुरुमंत्र'; भारत-पाकिस्तान सामन्यावरही दिली मोठी प्रतिक्रिया

T20 World Cup: युवराज सिंगने टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे.
Team India | Yuvraj Singh
Team India | Yuvraj SinghSakal
Updated on

Yuvraj Singh on Team India: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला रविवारी (2 जून) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारताला पहिला सामना 5 जून रोजी खेळायचा आहे. या स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी भारतीय संघाला दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने मोलाचा सल्ला दिला आहे.

टी20 वर्ल्ड कप 2007 स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग राहिलेल्या युवराजने यंदाच्या स्पर्धेसाठी उत्सुक असल्याचे म्हटले असून त्याने म्हटले आहे की भारतीय संघात आत्मविश्वासाची कमी नाही. युवराज टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर देखील आहे.

दरम्यान, भारताने 2013 नंतर एकदाही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ गेल्या 11 वर्षांची ही प्रतिक्षा संपवण्यासाठी यंदा प्रयत्न करणार आहे.

Team India | Yuvraj Singh
T20 World Cup: पहिल्याच सामन्यात अमेरिकेच्या पठ्ठ्याची आतिषबाजी; 10 सिक्स ठोकत 'युनिवर्स बॉस' गेलची केली बरोबरी

आयसीसीशी बोलताना युवराज म्हणाला, 'मोठ्या स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास आहे. जर भारतीय संघाने स्वत:वर विश्वास ठेवला आणि आपल्या पूर्ण क्षमतेने खेळ केला, तर ते विजेतेपद मिळवू शकतात.'

'पूर्वी आपण अशाच गोष्टींवर लक्ष देत विजय मिळवले आहेत. आम्ही आमच्या ताकदीवर लक्ष दिले होते. प्रतिस्पर्धी संघ आपल्याला कुठे नुकसान पोहचवू शकतात, यावर आपण लक्ष नाही दिले पाहिजे. आपल्याला आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आपल्याकडे सामना जिंकून देणारे अनेक खेळाडू आहेत.'

तो म्हणाला, 'आयसीसी वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आयपीएल एक चांगली संधी होती. मला आशा आहे की ही शानदार स्पर्धा होईल. जर भारतीय संघ जिंकला, तर तो एक अविश्वसनीय क्षण असेल. भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकून आता खूप वर्षे झाले आहेत. आशा आहे की यावेळी आपला संधी ही प्रतिक्षा संपवेल.'

Team India | Yuvraj Singh
T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

भारत विरुद्ध पाकिस्तान भावनिक सामना - युवराज

युवराजने भारत आणि पाकिस्तान सामन्याबद्दलही प्रतिक्रिया दिली होती. त्याने म्हटले की 'भारत विरुद्ध पाकिस्तान हा भावनिक सामना असतो. जर आपण जिंकलो, तर आपण वेडे होऊ आणि ते जिंकले, तरी वेडेच होऊ. पण गोष्ट अशी आहे की जर आपण जिंकलो, तर ते आपल्यावर चिडतील, जर ते जिंकले, तर ते आपल्याला डिवचतील, हा फरक आहे.'

युवराज म्हणाला, 'मला वाटते की सामना भारताचा असो, पाकिस्तानचा किंवा कोणाचाही खेळाडू १०० टक्के देतील. मला नेहमी वाटते सामन्यावेळी जो संघ आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो आणि सामन्याच्या परिस्थितीवर लक्ष देतो, तो सामना जिंकतो.'

'गेल्या काही वर्षांपासून आपला पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे आशा आहे की यावेळी आपण ते कायम ठेवू.'

भारत आणि पाकिस्तान संघात 9 जुलै रोजी सामना होणार असून हा सामना न्युयॉकमधील नव्या स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी युवराजही स्टेडियममध्ये उपस्थित असणार आहे. याबद्दल युवी म्हणाला, की तो पहिल्यांदाच स्टेडियममधून भारत आणि पाकिस्तान सामना पाहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.