Team India play test against Bangladesh : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराहसह भारताचे १६ अव्वल खेळाडू काल चेन्नईत दाखल झाले. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने सरावालाही सुरुवात केली आहे. समोर बांगलादेश हा प्रतिस्पर्धी असला तरी त्यांना कमी लेखण्याची जी चूक पाकिस्तानने केली, ती आपण करून नक्कीच चालणार नाही. पाकिस्तानला त्यांच्याच घरी लोळवल्यानंतर बांगलादेशचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे आणि त्यांना रोखण्याचे आव्हान रोहित अँड टीमला पेलावे लागणार आहे. चेन्नईत होणारी ही कसोटी भारतासाठी खूप खास असणार आहे, कारण भारताच्या ९२ वर्षांच्या कसोटी इतिहासात रोहितला मोठा पराक्रम करण्याची संधी मिळाली आहे....