Mohammad Shami टीम इंडियात पुनरागमन कधी करणार? अजित आगरकरने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Ajit Agarkar on Mohammad Shami's Comeback: मोहम्मद शमी २०२३ वर्ल्ड कपनंतर क्रिकेट खेळलेला नाही, त्यामुळे आता त्याचे भारतीय संघात कधी पुनरागमन होऊ शकते. याबाबत निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने अपडेट्स दिले आहेत.
Mohammad Shami
Mohammad ShamiSakal
Updated on

Ajit Agarkar on Mohammad Shami's Return: भारतीय क्रिकेट संघ सोमवारी (२२ जुलै) श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचा नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. यादरम्यान, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबतही आगरकरने महत्त्वाची माहिती दिली.

आगरकरने दिलेल्या माहितीनुसार शमी सप्टेंबरमध्ये भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. शमी 2023 वर्ल्ड कपनंतर क्रिकेट खेळलेला नाही. त्याने या वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी करताना सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या होत्या.

पण २०२३ वर्ल्ड कपपासून तो टाचेच्या दुखापतीचा सामना करत होता. अखेर त्याला फेब्रुवारी 2024 मध्ये शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे त्याला आयपीएल २०२४ आणि टी२० वर्ल्ड कप स्पर्धाही खेळता आली नाही.

Mohammad Shami
नवा कोच, नवा कर्णधार! Hardik Pandya ची मिठी अन् टीम इंडियाची श्रीलंका दौऱ्यासाठी भरारी, video

आता यानंतर त्याचे पुनरागमन कधी होऊ शकते, याबाबतच्या प्रश्नावर आगरकर म्हणाला,'आम्हाला साधारण दुखापत असलेल्या खेळाडूंबाबत माहित आहे, आशा हे की ते लवकर पुनरागमन करतील.

'शमीने गोलंदाजीची सुरूवात केली आहे, जी चांगली गोष्ट आहे. बांगलादेशविरुद्ध १९ सप्टेंबरपासून कसोटी सुरू होणार आहे, त्यात त्याला संधी देण्याचे लक्ष्य आहे. पण तोपर्यंत तो पूर्ण तंदुरुस्त असेल की नाही, हे माहित नाही. आम्ही याबद्दल एनसीएमधील लोकांना विचारून ठरवू.'

शमीने शस्त्रक्रियेनंतर नुकतीच आता गोलंदाजीची सुरुवात केली असून आता तो तंदुरुस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

Mohammad Shami
Gautam Gambhir on Virat Kohli: ''TRP साठी चांगलं आहे...!'' विराटसोबतच्या नात्यावर गौतमचं रोखठोक उत्तर

याशिवाय आगामी काळात अनेक कसोटी सामने खेळायचे असल्याने आणखी वेगवान गोलंदाजीचे पर्यायही शोधण्याचा प्रयत्न असणार आहे, असंही आगकरने सांगितले.

आगरकर म्हणाला, 'आगामी काळात खूप कसोटी सामने आहेत, त्यामुळे वेगवान गोलंदाजांचीही आम्हाला सखोलता हवी आहे. बुमराह, शमी आणि सिराज मागील काही काळापासून संघात आहेत आणि ते यापुढेही असतील. पण याबाबतही चर्चा झाली आहे की आता प्रथम श्रेणी क्रिकेटही बरेच खेळले जाईल, त्यातूनही काही पर्याय मिळू शकतात.'

दरम्यान, भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान बांगलादेशविरुद्ध मायदेशात दोन कसोटी आणि तीन टी२० सामने खेळायचे आहेत.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.