भारत-बांगलादेश यांच्यातला पहिला कसोटी सामना गुरुवारी चेन्नई येथे खेळवण्यात येणार आहे. बांगलादेशने नुकतीच पाकिस्तानात जाऊन दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली आहे. त्यामुळे त्यांना हलक्यात घेण्याची चूक भारतीय संघ नक्कीच करणार नाही. त्यामुळेच अंतिम संघ निवडताना खूप विचार केला जाईल हे स्पष्ट आहे. अशातच काल कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाचे संकेत दिले होते. त्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने तर दोन खेळाडूंची नावं घेत, त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे स्पष्ट केले.