भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्या मनमोकळ्या गप्पांनी क्रिकेट चाहत्यांचा आजचा दिवस बनवला. या दोघांनी क्रिकेटचं बदललेलं स्वरूप, कसोटी क्रिकेटचं महत्त्व, भारताच्या जलदगती गोलंदाजांची कामगिरी यावर गप्पा मारल्या. दोघांनी दोघांमधील वादावरही पडदा पाडला. पण, ही मुलाखत संपता संपता दोघांनी कर्णधार रोहित शर्माची ( Rohit Sharma) खिल्ली उडवली.