IND vs BAN: भारतीय संघाच्या वादळात बांगलादेश नेस्तनाबूत! कसोटीपाठोपाठ T20I सिरिजमध्येही व्हाईटवॉश

India Whitewash Bangladesh in T20I Series: भारतीय क्रिकेट संघान बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यांत १३३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेतही निर्विवाद वर्चस्व ठेवलं.
India vs Bangladesh 3rd T20I
Team India Sakal
Updated on

India vs Bangladesh 3rd T20I: भारतीय संघाने शनिवारी (१२ ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्ध हैदराबादला झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात १३३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची टी२० मालिका ३-० अशा फरकाने जिंकत बांगलादेशला व्हाईटवॉश दिला.

यापूर्वी भारताने कसोटी मालिकेतही बांगलादेशला २-० असा व्हाईटवॉश दिला होता. त्यामुळे आता बांगलादेश भारत दौऱ्यातून रिकाम्या हाताने मायदेशी परतणार आहेत.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने बांगलादेश समोर २९८ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकात ७ बाद १६७ धावाच करता आल्या. या सामन्यानंतर बांगलादेशचा अष्टपैलू महमुद्दुलाहने निवृत्ती घेतली.

India vs Bangladesh 3rd T20I
IND vs BAN: हर्षित राणाला का दिली नाही पदार्पणाची संधी? टॉसनंतर लगेचच BCCI ने सांगितलं खरं कारण

बांगलादेशकडून परवेझ हुसैन इमॉन आणि तान्झिद हसन यांनी डावाची सुरुवात केली होती. पण पहिल्याच चेंडूवर परवेझला मयंक यादवने रियान परागच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर तान्झिदने कर्णधार नजमुल हुसैन शांतोच्या सहाय्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु., तान्झिद हसन १५ धावा करून, तर शांतो १४ धावांवर बाद झाला.

यानंतर लिटन दास आणि तौहिद हृदोयने अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. त्यांनी १०० धावांचा टप्पा संघाला १० षटकांच्या दरम्यान पार करून गिला. पण लिटन दासला १२ व्या षटकात रवी बिश्नोईने ४२ धावांवर बाद केले.

यानंतर मात्र एक बाजू अर्धशतकी खेळी करत तौहिदने सांभाळलेली असताना दुसऱ्या बाजूने महमुद्दुलाह (८), मेहदी हसन (३) आणि रिशाद हुसैन (०) यांनी स्वस्तात विकेट्स गमावली. अखेरीस तौहिद ४२ चेंडूत ६३ धावांची खेळी करून नाबाद राहिला. तान्झिम हसन साकिब ८ धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मयंक यादवने २ विकेट्स घेतल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

India vs Bangladesh 3rd T20I
Sanju Samson Century: 6,6,6,6,6... बूमबूम सॅमसन! फक्त ४० चेंडूत ठोकलं शतक! हे रेकॉर्ड झाले ब्रेक

तत्पुर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद २९७ धावांचा डोंगर उभारला होता. सलामीवीर अभिषेक शर्मा ४ धावांवर बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने १११ धावांची वादळी शतकी खेळी केली. तसेच सूर्यकुमारने ७५ धावांची खेळी केली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी झाली.

त्यांच्यानंतर रियान पराग (३४ धावा) आणि हार्दिक पांड्या (४७ धावा) यांनीही आक्रमक खेळ केला. त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या उभारली.

बांगलादेशकडून तान्झिम हसन साकिबने ३ विकेट्स घेतल्या, तर तस्किन अहमद, मुस्तफिजूर आणि महमुद्दुलाह यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.