IND vs SL ODI: श्रीलंकेला अतिघाई नडली, फलंदाज नॉटआऊट असूनही परतला पॅव्हेलियनमध्ये अन् मग...; नक्की घडलं काय?

India vs Sri Lanka 1st ODI: भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत श्रीलंकेचा फलंदाज नाबाद असूनही तंबुत परतल्याची घटना घडली. नक्की त्यावेळी काय झालेलं जाणून घ्या.
India vs Sri Lanka 1st ODI
India vs Sri Lanka 1st ODISakal
Updated on

India vs Sri Lanka 1st ODI: भारत विरुद्ध श्रीलंका संघात वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी झाला. कोलंबोला झालेल्या या सामन्यात दोन्ही संघात बरोबरी झाली. दरम्यान, या सामन्यात एक घटना अशी घडली ज्यामुळे श्रीलंकेचा प्रशिक्षक सनथ जयसूर्याही भडकलेला दिसला.

झाले असे की या सामन्यात यजमान श्रीलंका संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र सुरुवातीलाच झटपट विकेट्स श्रीलंकेने गमावल्या होत्या. मात्र सहाव्या क्रमांकावर आलेला जनिथ लियांगे दुनिथ वेल्लालागेसह श्रीलंकेचा डाव पुढे नेत होता.

India vs Sri Lanka 1st ODI
IND vs SL ODI: विजय ना भारताचा, ना श्रीलंकेचा! पहिल्या वनडेत बरोबरी

याचवेळी ३५ व्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजीला आला. त्याने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर लियांगेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू खेळपट्टीवरील धूळ उडवून मागे गेला आणि यष्टीरक्षक केएल राहुलच्या पॅडला लागून स्लीपमधील उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला.

यावेळी झेलबाद झाल्याचे समजून लियांगे पॅव्हेलियनमध्ये परण्यास निघाला त्याने रिव्ह्युची मागणी केली नाही. त्यामुळे पंचांनीही त्याला बाद दिले.

मात्र नंतर जेव्हा रिप्ले दाखवण्यात आला, त्यात चेंडू त्याच्या बॅटला लागलाच नसल्याचे स्पष्ट झाले, म्हणजे तो बादच नव्हता. मात्र तो आधीच पॅव्हेलियनमध्ये परतल्याने त्याला बाद समजण्यात आले. पण तो रिप्ले पाहून जयसूर्याही चिडला होता. लियांगेने २० धावा केल्या.

India vs Sri Lanka 1st ODI
IND vs SL 1st ODI Live : १६९१ दिवसानंतर पहिली विकेट; रोहितच्या 'लाडक्या'ने संधीचं केलं सोनं

श्रीलंकेकडून पाथम निसंकाने ५६ धावांची आणि वेल्लालागेने नाबाद ६७ धावांची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेने ५० षटकात ८ बाद २३० धावा केल्या.

भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतल २३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतालाही ४७.५ षटकात सर्वबाद २३० धावाच करता आल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने ५८ धावांची खेळी केली.

श्रीलंकेकडून कर्णधार चरिथ असलंका आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.