Pakistan vs Bangladesh 2nd Test: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात सध्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रावळपिंडीला सुरू आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली आहे.
पाकिस्तान मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी, तर बांगलादेश मालिका विजयसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे या चुरशीच्या सामन्यात पारडं कधी पाकिस्तानकडे, तर कधी बांगलादेशकडे झुकताना दिसत आहे. याबाबतच आता आर अश्विनने त्याची प्रतिक्रिया देत मतही व्यक्त केलं आहे.
या सामन्यात शेवटच्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी १४३ धावांची गरज आहे. दरम्यान चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असताना अश्विनने या सामन्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती, ज्याबाबत सध्या चर्चा होत आहे.