Team India T20 Captain : पडद्यामागे नेमकं काय घडतंय? रोहित शर्मामुळे हार्दिक पांड्याचा पत्ता कट? सूर्यादादा होणार टीम इंडिया कर्णधार

India squad for Sri Lanka tour : टीम इंडियाचा पुढचा T20 कर्णधार कोण असेल? याचे उत्तर शोधण्याचा बीसीसीआय सातत्याने प्रयत्न करत आहे यादरम्यान....
Suryakumar Yadav vs Hardik Pandya Rohit Sharma
Suryakumar Yadav vs Hardik Pandya Rohit Sharma sakal
Updated on

Team India New T20 Captain : टी-20 वर्ल्ड कप 2024 संपल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हिटमॅनच्या निवृत्तीनंतर बीसीसीआय टी-20 फॉरमॅटसाठी कायमस्वरूपी कर्णधाराच्या शोधात आहे.

रोहितनंतर हार्दिक पांड्याला टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा नियमित कर्णधार बनवले जाऊ शकते, अशा बातम्या अलीकडे आल्या होत्या. पण, आता नव्या वृत्तानुसार, रोहित शर्मामुळे आता हार्दिक नव्हे तर सूर्यकुमार यादव टी-20चा कायमस्वरूपी कर्णधार म्हणून पाहिले जात आहे.

Suryakumar Yadav vs Hardik Pandya Rohit Sharma
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपमध्ये ICCचे झाले इतके कोटींचे नुकसान, बैठकीपूर्वी मोठा खुलासा

रोहित शर्माने टी-20 मधून निवृत्ती घेतल्यापासून टीम इंडियाच्या पुढील टी-20 कर्णधाराचा शोध सुरू आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर जवळपास सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती, तेव्हा शुभमन गिलकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. परंतु तो फक्त त्या मालिकेसाठी कर्णधार बनला होता.

आता बोर्ड अशा कर्णधाराच्या शोधात आहे, जो दीर्घकाळ टी-20 फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करू शकेल. कर्णधाराच्या नावाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित शर्माकडून मत मागवले.

आता रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, जेव्हा रोहितला टी-20 कर्णधाराबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवले पाहिजे. अशा स्थितीत हिटमॅनच्या या मतानंतर हार्दिकसाठी कर्णधार बनणे कठीण दिसत आहे.

Suryakumar Yadav vs Hardik Pandya Rohit Sharma
Virat Kohli: अमित मिश्रानं विराटवर केलेले LSG खेळाडूंबरोबर भांडणाचे आरोप; पण नवीन-उल-हक म्हणाला, 'गोष्टी आता...'

कोणाचा रेकॉर्ड भारी?

भारतीय स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवचा कर्णधारपदाचा विक्रम हार्दिक पांड्यापेक्षा चांगला दिसत आहे. हार्दिकने आतापर्यंत 16 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे, ज्यामध्ये त्याने 10 सामने जिंकले आहेत, 5 गमावले आहेत, तर 1 सामना बरोबरीत राहिला आहे.

दुसरीकडे, सूर्याने सात टी-20I सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे, ज्यामध्ये त्याने 5 जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. जरी सुर्याने कमी सामन्यांमध्ये कर्णधार केले असले तरी त्याचे रेकॉर्ड अधिक चांगले दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.