भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी चेन्नईत खेळली जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतौने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.