IND vs BAN: ऋषभ पंत अन् Shubman Gill यांचा शतकी धमाका; भारताने ४ बाद २८७ धावांवर केला डाव घोषित

Shumban Gill - Rishabh Pant Century: भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत शतक ठोकले. त्यांच्या शतकानंतर भारताने दुसरा डाव ४ बाद २८७ धावांवर घोषित केला.
Shubman Gill
Shubman GillSakal
Updated on

India vs Bangladesh 1st Test: भारत विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेची सुरुवात झाली असून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व ठेवलं असून तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत पाठोपाठ भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलनेही शतकाला गवसणी घातली आहे.

भारताने ६४ षटकात ४ बाद २८७ धावांवर दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे पहिल्या डावातील २२७ धावांच्या आघाडीमुळे भारताने आता बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात दुसऱ्या डावात भारताने ६७ धावांवरच ३ विकेट्स गमावल्या होत्या, यात रोहित शर्मा (५), यशस्वी जैस्वाल (१०) आणि विराट कोहली (१७) यांच्या विकेट्सचा समावेश होता. परंतु, त्यानंतर १६७ धावांची भागीदारी ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांच्यात झाली.

Shubman Gill
IND vs BAN: अ‍ॅक्शन रिप्ले! Rohit Sharma दुसऱ्या डावातही फसला; एकाच पद्धतीने पुन्हा OUT झाला, जैस्वालही गंडला

या भागीदारीदरम्यान पंतने त्याचे सहावे कसोटी शतकही पूर्ण केले. पण शतकानंतर तो बाद झाला. पंतने १२८ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांसह १०९ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर केएल राहुल फलंदाजीला आला. यावेळी त्याच्याबरोबर खेळत असताना गिलनेही त्याचे शतक पूर्ण केले. गिलचे हे पाचवे कसोटी शतक ठरले.

दरम्यान, या सामन्यात पहिल्या डावात गिलला भोपळाही फोडता आला नव्हता, पण दुसऱ्या डावात त्याने शतकी खेळी केली आहे. तो १७६ चेंडूत ११९ धावांवर नाबाद राहिला, या खेळीत त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले. डाव घोषित केला, तेव्हा केएल राहुल १९ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या.

दरम्यान, २०२४ मधील गिलचे हे तिसऱ्या क्रमांकावर खेळताना भारतातील तिसरे कसोटी शतक आहे. त्यामुळे तो एकाच वर्षात तीन कसोटी शतके तिसऱ्या क्रमांकावर मायदेशात करणारा भारताचा तिसराच फलंदाज आहे. यापूर्वी दिलीप वेंगसरकर यांनी १९७९ मध्ये असा कारनामा केला होता. त्यानंतर चेतेश्वर पुजाराने २०१२ आणि २०१६ साली असा कारनामा केला आहे.

Shubman Gill
IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

या सामन्यात पहिल्या डावात भारताने ९१.२ षटकात सर्वबाद ३७६ धावा केल्या आहेत. भारताकडून आर अश्विनने ११३ धावांची शतकी खेळी केली, तर रविंद्र जडेजाने ८६ धावांची खेळी केली. तसेच यशस्वी जैस्वालने ५६ धावा केल्या. बांगलादेशकडून हसन मेहमुदने शानदार गोलंदाजी करताना ५ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर बांगलादेश संघाला केवळ १४९ धावाच करता आल्याने भारताने २२७ धावांची मोठी आघाडी मिळवली. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने ३२ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.