Suryakumar Yadav: 'मला फक्त पेपरवर कॅप्टन व्हायचं नाहीये, तर...' सूर्याचं टी२० नेतृत्वाबाबत मोठं भाष्य

Suryakumar Yadav on T20I Captaincy: भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादवने नेतृत्वाच्या जबाबदारीबद्दल आणि रोहित शर्माकडून मिळालेल्या शिकवणीबद्दल भाष्य केले आहे.
Suryakumar Yadav - Rohit Sharma
Suryakumar Yadav - Rohit SharmaSakal
Updated on

Suryakumar Yadav On Captaincy: सूर्यकुमार यादवकडे आता भारताच्या टी२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. रोहित शर्माने टी२० वर्ल्ड कप २०२४ नंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ही जबाबदारी सूर्यकुमारकडे सोपवण्यात आली आहे. सूर्यकुमारच्याही नेतृत्वात भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे.

सध्या त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध टी२० मालिका खेळ असून ग्वाल्हेरला झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. आता दुसरा सामना दिल्लीला ९ ऑक्टोबर रोजी होईल. त्याआधी सूर्यकुमारने त्याच्या नव्या भूमिकेबद्दल आणि रोहित शर्माकडून काय शिकायला मिळाले, याबाबत भाष्य केले आहे.

जिओसिनेमाशी बोलताना सूर्यकुमार म्हणाला, 'मी माझ्या नव्या भूमिकेचा आनंद घेत आहे. आमच्या प्रशिक्षकांनी आणि संघसहकाऱ्यांनी माझ्यासाठी नेतृत्व करणे सोपे केले आहे. मी माझ्या नव्या भूमिकेबाबत सकारात्मक आहे.'

'पण नेतृत्वाचा परिणाम मला माझ्या स्वभावावर होऊ द्यायचा नाही, मला मी जसा आधीपासून खेळत आहे, तसेच खेळणे कायम करायचे आहे. मला मैदानात आणि मैदानाबाहेर सारखेच रहायचे आहे.'

Suryakumar Yadav - Rohit Sharma
अरे भाऊ...! भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीवर कॅप्टन Suryakumar Yadav इम्प्रेस, भन्नाट Video

सूर्यकुमार पुढे म्हणाला, 'माझं तत्व इतकंच आहे की खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ खेळण्याचे स्वातंत्र्य द्यायचे. जेव्हा तुम्ही भारतीय संघात येता, तेव्हा फक्त तुमची जर्सी बदलते, पण यश मिळवण्याची प्रेरणा तशीच असते.'

'मला संघाचे पुढे येऊन नेतृत्व करायचे आहे, मला फक्त कागदावर कर्णधार रहायचे नाही. मी नेहमीच माझ्या सिनियर्सकडून शिकण्याचा प्रयत्न केला आहे आणि आशा आहे की मी माझ्या आधीच्या कर्णधारांकडून शिकलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करत असेल.'

त्याचबरोबर सूर्यकुमार रोहितबाबत म्हणाला, 'कानपूर कसोटीत रोहितला आक्रमक खेळताना पाहून असं वाटलं होतं की टी२० मालिका आत्ताच सुरू झाली आहे. जेव्हा दोन दिवसांपेक्षा अधिक वेळ वाया गेल्यानंतरही खूप कमी संघ आहेत, जे विजय कसोटीत निकाल लावू शकतात.'

'कानपूर कसोटी जिंकणे ही एका चांगल्या नेतृत्वाची खूण आहे. मी रोहितकडून नेतृत्वाबाबत खूप काही शिकलो आहे. मला आशा आहे की मी त्याच्याकडून शिकलेल्या गोष्टी माझ्या नेतृत्वातही वापरेल.'

Suryakumar Yadav - Rohit Sharma
IND vs BAN: 'फक्त वेग महत्त्वाचा नाही, तर गोलंदाजीत...', मयंक यादवने स्पष्टच सांगितलं

त्याचबरोबर सूर्यकुमारने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबरोबरही खास बाँड असल्याचे सांगितले. तसेच त्याचा नेहमी पाठिंबा असतो असंही सांगताना तो म्हणाला त्याने काहीही न सांगताही तो त्याला समजून घेतो.

त्याचबरोबर सूर्यकुमारने सांगितले की जर खेळाडूंनी अतिरिक्त कोणती जबाबदारी घेतली, तर ती त्याला आवडते. जसे की फलंदाजांनी एक-दोन षटके गोलंदाजी करणे, यामुळे संघाची ताकद वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.