India's road to WTC final: रोहितच्या टीम इंडियाला 'अधुरी कहाणी' पूर्ण करण्याची संधी...,मग मोहिम आत्ताच पूर्ण करा!

Challenges for India in WTC 2025: भारतीय संघ जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरण्यास सज्ज आहे. आता भारतासाठी हा आगामी हंगाम कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. तिसऱ्यांदा फायनल गाठण्याकडे आगेकुच करत असलेल्या भारतासमोरचे आव्हान कसे असणार आहे, याचा घेतलेला आढावा.
Team India
Team IndiaSakal
Updated on

Challenges for India in WTC 2025: जवळपास एका महिन्याच्या विश्रांतीनंतर भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरत आहे. तसं पाहिलं तर भारतीय क्रिकेट आणि विश्रांती असा योग फारच दूर्मिळ असतो. एक मालिका संपते तोच दुसरी मालिका...ही माळ एकात एक अशी गुंतलेली असते बघता बघता आपण किती सामने खेळलो हे खेळाडूंनाही कळतही नाही.

योगायोगानं, सूदैवाने किंवा नियोजनामुळे म्हणा भारतीय संघाला चांगलीच विश्रांती मिळालीय हे खरे असले तरी आता पुढे विश्रांतीचा विचारही करायचा नाही, इतक्या सामन्यांचा खो-खो रोहित शर्मा आणि त्याच्या संघाला करायचा आहे. पण त्यात महत्वाची आहे ती कसोटी अजिंक्यपद मालिका आणि त्यातला अंतिम सामना. भारतासाठी ही एक अधुरी कहाणी आहे.

कारण व्हाईटबॉल क्रिकेटच्या विश्वकरंडक अपयशाची कोंडी रोहित शर्माच्या संघाने जूलै महिन्यात फोडली आणि भारतीय संघ १३ वर्षांनी पुन्हा विश्वविजेता ठरला. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखूनही विजेतेपद काही मिळालेले नाही.

Team India
IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाला घरात घुसून पुन्हा हरवणार अन् भारत मालिका 'या' फरकानं जिंकणार, गावसकरांचा दावा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.