India vs Bangladesh 1st Test Day 1 Weather report - भारतीय संघ जवळपास ४५ दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघ उद्यापासून कसोटी मालिकेत बांगलादेशचा सामना करणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. बांगलादेशने नुकतेच पाकिस्तानात जाऊन कसोटी मालिका २-० अशी जिंकून इतिहास घडवला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध मैदानावर उतरताना त्यांचे मनोबल उंचावलेले असेलच. पण, या दोन्ही संघांच्या मार्गात वरुणराजा खोडा घालू शकतो.