Hardik Pandyaचे भविष्य धोक्यात! टीम इंडियापाठोपाठ IPLमधूनही जाणार कर्णधारपद? 'हा' खेळाडू बनला कारण

हार्दिक पांड्याला टीम इंडियाचे कर्णधारपद मिळाले नाही. त्याच्या जागी बीसीसीआयने सूर्यकुमार यादववर विश्वास व्यक्त केला आहे.
Hardik Pandya Mumbai Indians
Hardik Pandya Mumbai Indianssakal
Updated on

Hardik Pandya Mumbai Indians : श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवची होत आहे. खरंतर, बीसीसीआयने टी-20 संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवले आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत तो भारतीय संघाचा उपकर्णधारही होता. पण श्रीलंका दौऱ्यासाठी तो टी-20 संघात असला तरी त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही.

आता हार्दिक पांड्या अजूनही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे की बाहेर आहे हा प्रश्न आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये चमकदार कामगिरी करूनही हार्दिककडे कर्णधार म्हणून दुर्लक्ष करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या पांड्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Hardik Pandya Mumbai Indians
Hardik Pandyaसोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशाचा फर्स्ट लुक व्हायरल! अगस्त्य व्हिडिओमध्ये काय करतोय?

आयपीएल 2024 च्या हंगामातून हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले. रोहित शर्माला हटवून एमआयने हार्दिकला संघाचा कर्णधार बनवले होते, पण सूर्यकुमार यादवही मुंबई इंडियन्सकडून खेळतो आणि आता तो टी-20 मध्येही टीम इंडियाचा कर्णधार आहे.

आयपीएल 2025 चा मेगा लिलाव होणार आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सचा सूर्या मोठी ऑफर देऊ शकतो. सूर्यकुमार यादवला कायम ठेवण्यासाठी एमआयला मोठा खर्च करावा लागू शकतो.

Hardik Pandya Mumbai Indians
Paris Olympics 2024: पॅरिसच्या 'पंढरीत' 'वारकऱ्यां'चे आगमन; ऑलिंपिकच्या क्रीडानगरीचे उद्घाटन ;खेळाडू दाखल

आयपीएल 2025 साठी संघ किती खेळाडूंना कायम ठेवू शकतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अहवालानुसार, एक संघ 4 खेळाडूंना कायम ठेवू शकतो, त्यापैकी 3 भारतीय आणि एक विदेशी खेळाडू असेल. असेच राहिल्यास मुंबई इंडियन्सकडे सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवण्याचा पर्याय असेल.

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा होण्यापूर्वी 20 मध्ये हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवण्याची पूर्ण अपेक्षा होती, पण तसं काही घडलं नाही. अशा स्थितीत टीम इंडियातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.

पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीही होणार असून श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत हार्दिकला स्थान मिळालेले नाही. अशा स्थितीत त्याच्या कारकिर्दीवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com